माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नामूळे जिल्हयाला आला केंद्र सरकारचा निधी
लातूर : केंद्र सरकारच्या दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव वाटप करण्यासाठी केंद्र सरकारकडुन ८ कोटी रुपयाचा निधी लातुरचे माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व लातुरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी खेचुन आणला. हा निधी वितरित करण्यासाठी लातुर जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सर्व बी.डी.ओ सोबत बैठक आयोजित करुन जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगाला घरपोच कृत्रिम अवयवाचे वाटप झाले पाहिजे. एक ही दिव्यांग या लाभापासुन वंचित राहणार नाही अशा सुचना संबधित अधिकार्यांना जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिल्या आहेत.
केंद्रशासनाच्या दिव्यांग योजनेअंतर्गत भारतातील फक्त दोनच जिल्हयांना निधी मिळाला असुन महाराष्ट्रातील एकमेव लातुर जिल्हयाची निवड झाली तर दुसरा जिल्हा हा उत्तरप्रदेशातिल गोरखपुर आहे. हा निधी मिळविण्यासाठी लातुरचे माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व लातुरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रयत्नामूळेच हा ८ कोटी रुपयाचा निधी लातुर जिल्हयाला मिळाला आहे.
राज्यातिल एकमेव जिल्हातील दिव्यांगाना कृत्रिम अवयव वाटपाचा निधी मिळण्याचा बहुमान लातुर जिल्हा परिषदेला माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व खा. सुधाकर शृंगारे यांच्यामूळे मिळाला असल्याचे लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सांगितले आहे.
जिल्हाभरातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव त्यांच्या घरपोच पुरवठा करण्यासाठीचे नियोजन करण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यावेळी बोलत होते. संवेदना आँपच्या मध्यमातुन
सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय भारत सरकार, दिव्यांग जन सशक्तिकरण विभाग, भारत सरकार अंगीकृत अलिमको, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर यांच्या वतीने 21 डिसेंबर 2019 ते 7 जानेवारी 2020 या कालावधीमध्ये तालुका निहाय दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव साहित्याचे वाटप करण्यासाठी शिबिर घेण्यात झाले होते. त्या शिबिरामध्ये पात्र असणाऱ्या 8797 दिव्यांग व्यक्तींना मोटार ट्रायसिकल, व्हीलचेअर, कुबड्या, कानाचे मशीन, काठी, वाकर इत्यादी साहित्य दिव्यांगांना घरपोच देण्यासाठीच्या नियोजनासाठी बैठकीचे आयोजन आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आली. या बैठकिला जिल्हयातिल सर्व तालुक्याच्या गट विस्ताराधिकार्यांसोबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी चर्चा केली.
यावेळी बैठकीला जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ.भारतबाई साळुंके, जिल्हा समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे, कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी खमितकर, जिल्हा शिक्षण अधिकारी जामदार मॅडम, संपूर्ण जिल्ह्यातील दहा तालुक्याचे गट विकास अधिकारी यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.