माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे परिवाराच्या वतीने माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त 2275 किटचे वाटप

माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे परिवाराच्या वतीने माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त 2275 किटचे वाटप



   उदगीर : माजी मुख्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे सुपुत्र विलासरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त गरीबांना 2275 किटचे वाटप काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या वतीने करण्यात येत आहे. आज पर्यंत लाॅकडाऊनच्या काळातही २१ हजारच्या जवळपास श्री.निटुरे यांनी गोरगरीबांना मदत केली असल्याने गरिबांचे ते ख-या अर्थाने आधारवड झाले आहेत.


दि.२७ मे रोजी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थित या जीवनाश्यक किटचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, यावेळी  अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नागप्‍पा अंबरखाने ब्लड बॅंकेचे अध्यक्ष रमेश अंबरखाने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, बाजार समितीचे उपसभापती रामराव बिरादार, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, शहराध्यक्ष मंजूरखाॅ पठाण, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विजय निटुरे, सुनिल केंद्रे, श्रीनिवास एकुर्केकर, अशोक मुळे आदी उपस्थित होते.


कोरोणा विषाणूचा प्रादुर्भावामुळे लाॅक डाऊन व संचारबंदी जाहीर झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यापासून हातावर पोट असलेल्या गरजू कुटुंबाला माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांच्या वतीने अविरतपणे अन्नधान्याच्या किटचे वाटप चालू आहे. आज पर्यंत २१ हजार अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले असून हे कार्य अविरतपणे चालू राहणार आहे.


आजपर्यंत उदगीर शहर व तालुक्यात गोरगरीबांच्या मदतीला नेहमीच धावणारे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांनी वेगवेगळ्या माध्यामातून समाजसेवा करुन असंख्य कुटुंबाना आधार दिला आहे तर त्यांचे चिरंजीव युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विजय निटुरे हे आपल्या वडिलांचाच वारसा सांभाळत असुन शहरातील अशोक नगर, किल्ला गल्ली, समतानगर, बनशेळकी रोड, गांधीनगर, संजय नगर, फुलेनगर व शहरालगतच्या अनेक भागातील 21 हजार गोरगरिबांना आजपर्यंत  जीवनावश्यक किटचे वाटप केले आहे. त्यामुळे शहर व तालुक्यातील गरीब नागरिकांनी निटुरे कुटुंबीयाचे आभार मानले आहेत.