मातृभूमी मित्रमंडळाच्या वतीने जिवनावश्यक वस्तूंचे वाटप
उदगीर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मातृभूमी ग्रूपच्या वतीने उदगीर व परीसरातील गरजूना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.
यावेळी तहसिलदार व्यंकटेश मुंडे , गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण ,मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी सतिश उस्तुरे , संतोष जिरोबे , शिवाजी गिरी , शिवशंकर पाटील , संभाजी शिंदे , रविंद्र महेंद्रकर, रामदास मलवाडे , बालाजी पेन्सलवार ,राहुल वट्टमवार, अजित पस्तापुरे , मनोज सुकने, रविंद्र गुमीडेली, सुधीर पाटील हे मिञपरीवार वेगवेगळ्या उपक्रमातून सामाजिक उपक्रम राबवत असतात.
कोरोनाच्या पिर्श्वभूमीवर गरजूंना तांदुळ, गहूपीठ , तेल , साबन ,तुरदाळ अशा जिवनावश्यक वस्तूचे ५०० किट वाटप करण्यात येत आहेत. आजपर्यंत विकासनगर, निडेबन व सोमनाथपूर परीसरातील गरजूनांना मदत देण्यात आली.