विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्नेहसंमेलन हे प्रभावी माध्यम :
जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे
उदगीर : आपल्या पाल्याच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता शाळेमध्ये आयोजित करण्यात येणारी स्नेहसंमेलने अतिशय उपयुक्त असतात या स्नेहसंमेलनामध्ये आपल्या पाल्यांचे कलागुण पाहण्यासाठी व त्यांचे कौतुक करण्यासाठी माता-पालक यांची लक्षणीय उपस्थिती असते,
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून आपापली पाल्य वेगवेगळ्या कलाविष्कार सादर करतात नृत्य, नाटिका ,डान्स , विविध वेषभुषा यांच्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडत असतो आणि तो घडवण्यासाठी शिक्षक ही मार्गदर्शकाची भूमिका पार पाडतात असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी व्यक्त केले.
शहरातील विद्यावर्धिनी प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटक म्हणून लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे बोलत होते.
या कार्यक्रमाला किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. विजयकुमार पाटील शिरोळकर हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव झोडगे, नामदेव चामले मामा, व्यंकटराव जाधव, केंद्रप्रमुख बालाजी धमन सुरे, शिवाजी महाविद्यालय चे प्राचार्य जाधव सर , अजित पाटील तोंडचिरकर , विशाल पाटील, माध्यमिक चे मुख्याध्यापक घोडके सर ,कणसे सर, अविनाश पोशेट्टी सर आदींसह शेकडो पालक उपस्थित होते.